सह्याद्रिनगर, कांदिवली (प)
+912228696958
info@ndpatilschools.com

Author: Umesh Jagtap

रयत शिक्षण संस्थेचे,

महाराष्ट्राच्या कडेकपा-यांना लिहितं-वाचतं करणारा एक महान कर्मयोगी “कर्मवीर भाऊराव पाटील”

कर्मवीर भाऊरावांनी महाराष्ट्राच्या कड्या-कपा–यांना लिहितं-वाचतं केले.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे तेराव्या शतकात महाराष्ट्रावर जेवढे उपकार आहेत,तेवढेच या ज्ञानवंत कर्मवीर भाऊरावांचे विसाव्या शतकात महाराष्ट्रावर उपकार आहेत.प्रत्येक गावात एखादे देऊळ असे असते की,ज्याचे शिखर कित्तेक कोसावरून दिसते.महाराष्ट्राच्या लोकजीवनात अशी शिखरे सोन्याच्या कळसाने सजलेली आपल्याला जगाच्या पाठीवरून कोठूनही दिसतील,त्यातील कर्मवीर भाऊराव पाटील हे एक सोन्याच्या कळसाचे उत्तुंग शिखर आहे.या देवळातील…
Read more

ज्ञानरचनावाद शिक्षणाचा पाया

I never teach my pupils,I only attempt to provide the conditions in which they can learn. Albert Einstein मुले स्वतः च आपल्या ज्ञानाची निर्मिती करीत असतात.मुलांची ज्ञाननिर्मितीची ही नैसर्गिक पद्धती औपचारिक शिक्षणात आणली तर  ख-या अर्थाने शिक्षण बालकेंद्री होईल.असे ब्रुनरसारख्या बोधात्मक-मानसशास्त्रज्ञाना वाटले आणि त्यातूनच ज्ञानरचनावादी शिक्षणासंबंधी चर्चा सुरु झाली.ज्ञानसंरचनावाद ज्या कारणांनी विकसित झाला.त्या बालकेंद्री शिक्षणासाठीच…
Read more

आता नको आय.ए.एस.सेवा , हवी आहे आय.डी.एस.सेवा’ I.A.S.- INDIAN ADMINISTRATIVE SERVICES I.D.S.-INDIAN DEVELOPMENT SERVISES

आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून आता ७० वर्षे होत आहेत.या सत्तर वर्षात भारताची लोकसंख्या अंदाजे १२० कोटी झाली आहे.अजूनही निरक्षरता आहे,कुपोषण आहे,प्राथमिक शिक्षणाची आबाळ आहे तसेच आरोग्य सेवा नाही, जी आहे ती गैरसोईची आहे.अन्न,वस्त्र,निवारा या सुविधा मिळणे दुरापास्त झाले आहे.त्यातच जगण्यासाठी रोजगाराची सुविधा सुद्धा खूपच कमी आहेत,अशा परिस्थितीत भारत विकासाकडे वाटचाल कशी करणार ?याचा विचार सर्वांनी…
Read more